Skip to main content

गुरूजींचे विचारधन : सत्य आणि विपर्यास (समारोप)

 







वरील चित्रांमध्ये आपण पाहु शकता कि, किती खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. संघ कसा चालतो, संघ कार्यकर्ते कसे उभे राहतात, कार्यकर्ता उभी करायची पद्धत कशी असते, संघाची विचाराधारा काय आहे, संघाची शिस्त कशाप्रकारची आहे, संघ आणि सहयोगी संघटना यांचे संबंध निर्धारित करणारे निकष कोणते असतात, ह्या प्रश्नांची माहिती व जूजबी नसताना माहिती व ज्ञानाच्या अभावी अनेक पत्रपंडित संघाविषयी वाट्टेल तसे तारे तोडतात. रा. स्व. संघाचा "भविष्य का भारत - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का दृष्टिकोन" (१७ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१८) संघकार्याची ओळख करून देणारा हा कार्यक्रम होता. देश-विदेशतील लोकांना निमंत्रण देण्यात आले होते. भारतातील संघविरोधक, संघद्वेष्ट्यांनाही निमंत्रण दिले होते. एकजण फिरकला नाही, कारण त्यांच्याकडे बोलण्यासारखे नवीन मुद्दे नाहीत. तेच-तेच खोडलेले आरोप करत राहतात. ह्या कार्यक्रमात सरसंघचालकांनी प्रत्येक आरोपांचे खंडन केले होते. संघ "विचारधन"पुर्वीसुद्धा चालत होता. संघ ही शब्दप्रामाण्यवादी वा ग्रंथप्रामाण्यवादी संघटना नसून काळाप्रमाणे वाढत जाणारी संघटना आहे. आयुष्यभर तेच तेच उगाळत बसलेले आरोप प्रगल्भतेच्या उंचीवर न जाता आयुष्यभर जोपासलेला आकस जो पुर्वग्रह व अज्ञानावर आधारित आहे. पुरोगाम्यांना जर कृती हवी असेल तर सेवाभारती, वनवासी कल्याण आश्रमची कामे बघून यावी. अनेक बोलघेवड्या पुरोगाम्यांपेक्षा जीवनविकास संघसंस्थांनी अधिक केला आहे. "विचारधन"ला संघ नव्हे तर विरोधक कवटाळून बसले आहेत. कोणीतरी वाद घालतो म्हणून त्याच्याशी वाद घालत बसण्यात काही अर्थ नसतो.  विचारणारा जर उत्सुक, बुद्धीवादी किंवा तुमच्या बोलण्याचा त्याच्यावर परिणाम होणार असेल तर अर्थ आहे. निराधार आरोप आणि अनाठायी सल्ले देणा-यांशी वाद घातला, तर आपला वेळ वाया जाणार. गीतेमध्ये सांगितले आहे कि, "कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नये". तुम्ही स्पष्टीकरण देता म्हणजे फळाची अपेक्षा करता ! हृदयपरिवर्तन, मतपरिवर्तन हे प्रकार १९४८ नंतर महात्मा गांधींसोबत निघून गेले आहेत, आज निव्वळ बुद्धी मारण्याचे काम चालू आहे. आपल्याजवळ करण्यासारख्या भरपुर गोष्टी आहेत. समाजाला आणि देशाला आपल्याकडून भरपुर अपेक्षा आहेत त्यावर लक्ष देऊया. समाजातील प्रत्येक घटकांना आपल्यासोबत घेऊन काम करायचे आहे. "परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रम" हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन कार्य करूया. तथाकथित बुद्धीवाद्यांच्या नादी लागून स्वताला त्रास करून घेऊ नका.

Comments

Popular posts from this blog

दोन वाचाळवीर -

दोन तोंडे नको त्यावेळी उचकटली गेली आहेत. एक आहेत मुस्लिमांचे पार्ट टाईम कैवारी मौलाना जावेद अख्तर, आणि दुसरे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे रामभक्त सीताराम येचुरी. हे दोघेही डाव्या विचारांचे असल्यामुळे तोंड उचकटणे हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. भाषणस्वातंत्र्याबरोबर अभिव्यक्तीस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, व्यक्तीस्वातंत्र्य हे त्यांचे अधिकार आहेत. विशेष म्हणजे ह्या अधिकारांची डाव्यांनी कधीच कदर केली नाही, नेहमीच त्यांची मुस्कटदाबी आणि अवहेलना केली. आता हे आयते मिळाल्याने फुकटची मिरासदारी मिरवत आहेत ! श्रीलंकेतील बाँबस्फोटानंतर मुस्लिम महिलांच्या बुरख्यावर बंदी घालण्यात आली, केरळमध्येसुद्धा बंदी घालण्यात आली. (केरळमध्ये माकपचे सरकार आहे) ३ मे २०१९ रोजी बुरख्याप्रमाणे घुंघटावर बंदी घालावी अशी हास्यास्पद मागणी मौलाना अख्तरांनी केली. सामनात मुस्लिम महिलांच्या बुरख्यावर मागणी घालावी, असा लेख आल्याने खळबळ माजली. त्यापुर्वी श्रीलंकेत अध्यादेश काढून सार्वजनिक ठिकाणी बुरखाबंदी केली, फ्रान्समध्येसुद्धा बुरखाबंदी आहे ! मुस्लिम महिलांनी बुरखा घालणे किंवा न घालणे हा त्यांचा प्रश्न आहे. अख्तर ह...

गुरूजींचे विचारधन : सत्य आणि विपर्यास - भाग ३

आक्षेप क्र. ३ - तिरंगा व राज्यघटनेला विरोध. प्रवाहपतितांची घसरगुंडी - उदाहरणार्थ आपल्या नेत्यांनी आपल्या देशासाठी एक ध्वज तयार केला. त्यांची प्रवाहपतित अवस्था, परानुकर...

परत गांधी आमचे सावरकर तुमचे -

नुकतीच एक बातमी वाचनात आली. ती म्हणजे, राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारने १० वी च्या शैक्षणिक अभ्यासक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी एक बदल केला आहे. राजस्थानमध्ये ज्या विचाराचं सरकार येतं, तसे बदल पाठ्यपुस्तकातील इतिहासात होतात. भाजपच्या काळात विस्तारात आणलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या इतिहासाला गेहलोत सरकारने कात्री लावली आहे. जेलमध्ये होणा-या त्रासाला कंटाळून वीर सावरकरांनी ब्रिटीशांकडे चारवेळा दयेची याचिका केली आणि सरकारच्या अनुसार काम करण्याची आणि स्वताला पोर्तुगालचा मुलगा असल्याचं सांगितल्याचा उल्लेख केला. ब्रिटीशांनी सावरकरांची याचिका स्वीकारून १९२१ साली त्यांना जेलमधून मुक्त केले. तिथून सुटल्यावर हिंदूमहासभेत प्रवेश करून देशाला हिंदूराष्ट्र बनविणयाची संकल्पना मांडली. दुस-या महायुद्धाच्या काळात ब्रिटीश सरकारला मदत केली. १९४२ च्या "भारत छोडो" या आंदोलनाला सावरकरांनी विरोध केला होता. तसेच महात्मा गांधींच्या हत्येमधील मुख्य आरोपी नथुराम गोडसेला मदत केल्याच्या आरोपाचाही खटला सुरू होता. त्यातून सावरकरांची मुक्तता झाली, अशा आशयाचा इतिहास शिकवला जाणार आहे. सावरकरांच्...