Skip to main content

दोन वाचाळवीर -

दोन तोंडे नको त्यावेळी उचकटली गेली आहेत. एक आहेत मुस्लिमांचे पार्ट टाईम कैवारी मौलाना जावेद अख्तर, आणि दुसरे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे रामभक्त सीताराम येचुरी. हे दोघेही डाव्या विचारांचे असल्यामुळे तोंड उचकटणे हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. भाषणस्वातंत्र्याबरोबर अभिव्यक्तीस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, व्यक्तीस्वातंत्र्य हे त्यांचे अधिकार आहेत. विशेष म्हणजे ह्या अधिकारांची डाव्यांनी कधीच कदर केली नाही, नेहमीच त्यांची मुस्कटदाबी आणि अवहेलना केली. आता हे आयते मिळाल्याने फुकटची मिरासदारी मिरवत आहेत ! श्रीलंकेतील बाँबस्फोटानंतर मुस्लिम महिलांच्या बुरख्यावर बंदी घालण्यात आली, केरळमध्येसुद्धा बंदी घालण्यात आली. (केरळमध्ये माकपचे सरकार आहे) ३ मे २०१९ रोजी बुरख्याप्रमाणे घुंघटावर बंदी घालावी अशी हास्यास्पद मागणी मौलाना अख्तरांनी केली. सामनात मुस्लिम महिलांच्या बुरख्यावर मागणी घालावी, असा लेख आल्याने खळबळ माजली. त्यापुर्वी श्रीलंकेत अध्यादेश काढून सार्वजनिक ठिकाणी बुरखाबंदी केली, फ्रान्समध्येसुद्धा बुरखाबंदी आहे ! मुस्लिम महिलांनी बुरखा घालणे किंवा न घालणे हा त्यांचा प्रश्न आहे. अख्तर हे बुद्धीमान, कवी, गझलकार. पण त्यांना एवढे माहित नाही की घुंघट म्हणजे बुरखा नाही, डोक्यावर ओढलेला साडीचा पदर असतो. तो काळा नसतो आणि मुस्लिम महिलांप्रमाणे संपुर्ण शरीर झाकणारादेखील नसतो ! घुंघट एवढ्यासाठीच ओढायचा की, मोठे दीर, सासरे, काका, मामा अशी वडिलधारी मंडळी आल्यावर त्यांच्यापुढे नम्र राहायचे. ही प्रथा आहे, धार्मिक रूढी-पंरपरा नाही. हिंदूंच्या कोणत्याही धर्मग्रंथात घुंघट ओढलाच पाहिजे असा आदेश नाही ! हा प्रथा-पंरपरेचा प्रश्न आहे. रितीरिवाज हा समाज पाळतो, परंपरेचे पालन करण्यात त्याला आनंद वाटतो. ह्या रितीरिवाजात कसलीही उच्च-नीचता नसून मर्यादांचे पालन त्यात असते. काळानुसार प्रथा-परंपरा बदलतात. घुंघट ओढायची प्रथा उत्तर भारतात जास्त आहे, पण ती सर्वच घरात आहे असे नाही. ती हळूहळू इतिहासजमा होईल. हिंदू म्हणजे मुसलमान नाही. जे इस्लामी देशात चालू आहे, ते पवित्र मानून "कयामत के दिन तक" त्याचे पालन करत राहायचे असे नाही. घुंघट पद्धत गावात पाळली जाते. मात्र शहरांमध्ये मुली-महिला हमखास बुरखा आणि हिजाब घातलेल्या दिसतात. घुंघट या शब्दावर फार सुंदर गाणी लिहीली गेली आहेत. उदा - घुंघट के पट खोल, तोहे पियाँ मिलेंगे, घुंघट नही खोलूंगी सैंय्या तोरे आगे, घुंघट की आड से दिलबर का, अरे यार मेरी तुम भी हो गजब; घुंघट तो जरा ओढो,  गोरी घुंघट में मुखडा छुपाओ ना इ. अशी सुंदर गाणी बुरख्यावर लिहील्याचे माझ्या ऐकण्यात आले नाही. मुळात घुंघट ओढणे आणि बुरखा पांघरणे ह्यात फरक आहे. भारतीय हिंदू स्त्री फक्त चेहरा झाकण्यासाठी घुंघट ओढते, आपले स्त्रीत्व झाकत नाही. बुरखा घालणारी व्यक्ती स्त्री आहे की पुरूष हे कळत नाही. त्या व्यक्तीकडे काही घातक शस्त्रास्त्रे आहेत हे कळण्यास अजिबात वाव नसतो. बुरखाबंदीमागे सुरक्षेचे कारण असून इतर प्रगत देशांसोबत मुस्लिम देशांमध्येही बुरखाबंदी आहे. आपण ज्या क्षेत्रात राहतो तिथे घुंघटवर किती सुंदर गाणी तयार झाली ह्याचा अख्तरसाहेबांनी अभ्यास करावा. आपली डावी सांप्रदायिकता बुरख्यात ठेवणेच योग्य ठरले. पुढे त्यांनी कोलांटी उडी मारली ! ते ट्विट करून म्हणाले, "महिला सशक्तीकरणासाठी बुरख्यासोबत घुंघट घालण्यावर प्रतिबंध असावा". घुंघट ओढणा-या स्त्रियांची अवस्था अख्तरसाहेब सांगतात इतकीही दयनीय नाही ! घुंघट ओढणारी स्त्री आणि मुंबई, नागपुरसारख्या दमट हवेत हिजाब घालणारी स्त्री ह्या दोघींची अवस्था समजून घ्या, मगच बोला !

दुसरे आहेत रामभक्त सीताराम येचुरी... ते म्हणाले, "रामायण आणि महाभारत हिंसाचाराने भरलेले आहे. प्रचारक म्हणून तुम्ही महाकाव्याचे उदाहरण देता आणि सांगता की हिंदू हिंसक असू शकत नाही. एक धर्म हिंसेवर विश्वास ठेवतो तर हिंदू हिंसेवर विश्वास ठेवत नाही, या तर्काला काहीच अर्थ नाही. हिंदू हिंसक असून हिंदू धर्म हिंसेला प्रोत्साहन देतो". त्यापुढे ते म्हणाले, सावरकरांनीही हिंदुत्वाचा हिंदू धर्माशी संबंध नसल्याचे म्हटले आहे. हिंदूंचे लष्करीकरण आणि हिंदूंना लष्करात भरती होण्यास प्रोत्साहन देणे ही त्यांची घोषणा होती. ह्यांना सावरकरांची हिंदुत्व ही संकल्पना पटली का ? स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदुत्ववादी होते म्हणून त्यांना संकुचित, जातीय म्हणणारे डावे आणि पुरोगामीच आहेत ! मुळातच डाव्यांना हिंसाचार प्रिय आहे. डाव्यांचे नायक लेनिन, माओ, स्टॅलिन ह्यांनी आपल्या राजवटीत साडेतीन ते चार कोटी लोकांची हत्या केली. त्यात माओची चीनमधील सांस्कृतिक क्रांती म्हणजे नरपशू प्रवृत्तीच होय ! केरळ, त्रिपुरा, आसाममध्ये मार्क्सवाद्यांच्या हिंसाचाराला बळी पडणारे संघस्वयंसेवक, भाजपा कार्यकर्ते-नेते आणि त्यांचे कुटूंबीय, त्याचबरोबर माओवाद्यांकडून पोलिस, सैनिक, निरपराध आदिवासींची हत्या हे सगळे असह्य आहे. "विरोधी विचार व्यक्त करणारा आपला शत्रू, आणि शत्रूला जगायचा अधिकार नाही" असे तत्वज्ञान पाळणा-या डाव्यांनी रामायण-महाभारतावर बोलूच नये. दोन महाकाव्यांचे नाव घेऊन येचुरींची वाणी आणि विचार पवित्र होणार नाहीत. रामायण आणि महाभारतातील युद्धे धर्मासाठी झालेली होती. धर्म म्हणजे न्याय, धर्म म्हणजे नीती, धर्म म्हणजे न्यायपूर्ण हक्क, त्याच्या प्रस्थापनेसाठी युद्ध घडली. रावणाने सीताहरण आणि दुर्योधनाने द्रौपदीचे वस्त्रहरण करायला लावले म्हणजे अधर्म केला, नीता सोडली. हे युद्ध स्टॅलिन आणि हिटलरसारखे नव्हते. दुस-याचे स्वातंत्र्य हिरावण्यासाठी युद्ध झाले नव्हते. हंगेरी, पोलंड, तिबेट बळकावण्यासारखे कारस्थान नव्हते. रामाने युद्ध होऊ नये म्हणून हनुमान, अंगद ह्यांना शिष्टाईसाठी रावणाकडे पाठवले होते. महाभारताचे युद्ध होऊ नये म्हणून श्रीकृष्ण शिष्टाईसाठी दुर्योधनाकडे गेला होता. हिंसेसाठी हिंसा म्हणून ही युद्ध झालेली नाहीत. जिहादी दहशतवादाचे समर्थन करण्यासाठी हिंदूदेखील हिंसकच आहेत. हे येचुरींसारखे महाभागच म्हणू शकतात. रावण, दुर्योधनाप्रमाणे ज्यांचा जन्म अधर्मचारणासाठी झाला आहे, त्यांच्याकडून अपेक्षा करण्यात तरी काय अर्थ आहे ? 

डाव्यांना कधी कळणार ? - हिंदूंचा स्वभाव कसा आहे, हे मॅक्स मुलर ह्यांनी What can India teach us ह्या भाषण मालिकेत उत्तमरित्या सांगितले आहे. भारतात सनदी नोकर म्हणून येणा-या ब्रिटीश मुलांसमोर १८८२ साली त्यांची भाषणे झालेली आहेत. ते म्हणतात, "सर्व संपत्तीने युक्त असा देश, जगाच्या पाठीवर शोधण्यासाठी मी जेंव्हा पाहतो तेंव्हा माझे लक्ष भारताकडे जाते. भारताचा काही भाग भूलोकीचा स्वर्गच आहे. जर मला कोणी विचारले की मन आणि बुद्धीची देणगी माणसाला मिळालेली आहे, तिचा सर्वोत्तम विकास कोठे झाला, तर भारतात झाला. जीवनाचे गुंतागुंतीचे प्रश्न आणि त्यातील काहींची उत्तरे प्लेटो आणि कान्ट यांनी शोधण्याचा प्रयत्न केला आहे, पण भारताने त्याची उत्तरे शोधली आहेत". हुऐनत्संग हा चीनी प्रवासी लिहीतो (सातवे शतक), "जरी भारतीय सौम्य स्वभावाचे असले तरी प्रामाणिकपणा आणि स्पष्टवक्तेपणा ही त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये आहेत. ते कोणाचेही धन अन्यायाने लुटत नाहीत. न्यायाच्या बाबतीत ते अतिउदार असतात. स्पष्टपणा हा त्यांच्या कारभाराचा एक विशेष आहे". मॅक्स मुलर मुस्लिम इतिहासकार इद्रिस याचे म्हणणे सांगतात, "हिंदू नैसर्गिकताच न्यायाच्या पक्षाचे असतात. ते आपल्या कृतीने यापासून कधीही दूर जात नाहीत. त्यांच्या श्रद्धा, प्रामाणिकता अंगीकृत कार्याबद्दल त्यांच्या निष्ठा फार प्रसिद्ध आहेत. आपल्या गुणांमुळे ते इतके विश्वविख्यात आहेत की, जगाच्या कानाकोप-यातील त्यांच्या देशाला भेट देतात". डावे स्वताला प्रखर बुद्धीवादी समजतात. म्हणूनच मॅक्स मुलर ह्यांच्या भाषणातील संदर्भ दिले आहेत. आजच्या काळात ज्यांच्या बुद्धीमुळे वाद होतात, त्यांनाच बुद्धीवादी म्हणावं लागेल. रामायण-महाभारत आणि त्यानंतरचा हिंदू कसा आहे ? हे जगाला कळले ! पण डाव्यांना कधी कळणार ? 

- मिहीर कुलकर्णी. 

चित्रदालन -



Comments

Popular posts from this blog

गुरूजींचे विचारधन : सत्य आणि विपर्यास - भाग ३

आक्षेप क्र. ३ - तिरंगा व राज्यघटनेला विरोध. प्रवाहपतितांची घसरगुंडी - उदाहरणार्थ आपल्या नेत्यांनी आपल्या देशासाठी एक ध्वज तयार केला. त्यांची प्रवाहपतित अवस्था, परानुकर...

परत गांधी आमचे सावरकर तुमचे -

नुकतीच एक बातमी वाचनात आली. ती म्हणजे, राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारने १० वी च्या शैक्षणिक अभ्यासक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी एक बदल केला आहे. राजस्थानमध्ये ज्या विचाराचं सरकार येतं, तसे बदल पाठ्यपुस्तकातील इतिहासात होतात. भाजपच्या काळात विस्तारात आणलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या इतिहासाला गेहलोत सरकारने कात्री लावली आहे. जेलमध्ये होणा-या त्रासाला कंटाळून वीर सावरकरांनी ब्रिटीशांकडे चारवेळा दयेची याचिका केली आणि सरकारच्या अनुसार काम करण्याची आणि स्वताला पोर्तुगालचा मुलगा असल्याचं सांगितल्याचा उल्लेख केला. ब्रिटीशांनी सावरकरांची याचिका स्वीकारून १९२१ साली त्यांना जेलमधून मुक्त केले. तिथून सुटल्यावर हिंदूमहासभेत प्रवेश करून देशाला हिंदूराष्ट्र बनविणयाची संकल्पना मांडली. दुस-या महायुद्धाच्या काळात ब्रिटीश सरकारला मदत केली. १९४२ च्या "भारत छोडो" या आंदोलनाला सावरकरांनी विरोध केला होता. तसेच महात्मा गांधींच्या हत्येमधील मुख्य आरोपी नथुराम गोडसेला मदत केल्याच्या आरोपाचाही खटला सुरू होता. त्यातून सावरकरांची मुक्तता झाली, अशा आशयाचा इतिहास शिकवला जाणार आहे. सावरकरांच्...