Skip to main content

मोदींची मुलाखत आणि रविश कुमारांचा जळफळाट -

२३ एप्रिल २०१९ रोजी पंतप्रधानांच्या नवी दिल्लीतील ७ लोककल्याण मार्ग येथील निवासस्थानी अभिनेते अक्षयकुमार यांनी नरेंद्र मोदींची चालती-बोलती मुलाखत घेतली. आणि बुधवारी ती प्रसारित करण्यात आली. नेहमी राजकीय प्रश्नाभोवती घुटमळणा-या साच्याला अक्षयकुमारांनी दूर सारले. "मला सैनिक किंवा संन्यासी व्हायचे होते" असे मोदींनी त्यांच्या बालपणीचे लक्ष्य मोदींनी स्पष्ट केले. आंब्याविषयीचे प्रेम सांगतानाच त्यांनी हलाखीच्या कौटुंबिक परिस्थितीच्या आठवणीही सांगितल्या. देशातील राजकीय क्षितिज व्यापलेल्या आणि २४ तास राजकीय भूमिकेतच वावरणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अराजकीय दर्शन बुधवारी देशवासियांना घडले. बालपणीचा अल्लडपणा, कौटुंबिक स्थिती, जीवनाचे लक्ष्य, योगासनांचा प्रभाव ते झोपेचा त्रास आणि अगदी निवृत्ती जीवनापर्यंतच्या गोड-कटू आठवणी, अनुभव, निर्धार खुद्द मोदी यांच्याच शब्दात उलघडले. ही मुलाखत म्हणजे एकप्रकार स्वकथन केलेला बायोपिकच ठरला. अनेक पत्रकार, राजकारणी ह्यांना ही मुलाखत चांगलीच झोंबली. कोणत्याही राजकारणी, पत्रकारांवर मोदींनी कोणत्याप्रकारे टिकाटिप्पणी केली नव्हती.

राहुल गांधी - हकीकत रूबरू हो, तो अदाकारी नही चलती...जनता के सामने चौकीदार मक्कारी नही चलती. # choukidar Chor hai. 

आनंद शर्मा - ही मुलाखत पुर्वनियोजित करार आहे. 

प्रियांका गांधी - मोदींनी शेतक-यांशी चर्चा करायला हवी, शेतकरी अभिनेत्यांप्रमाणे खुशमस्करी करणारे प्रश्न विचारत नाही. 

राहुल गांधींची अशीच मुलाखत कॉलेज विद्यार्थ्यांच्या समुहात घेण्यात आली, त्यातील काही वाक्यांची टिंगल झाली किंवा त्याला प्रसारमाध्यमांनी वारेमाप प्रसिद्धी दिली नाही. अखेर वाहिनी आणि माध्यमांना वाचक
आणि श्रोता जपावा लागतो. ते कंटाळवाणे असल्यास दाखवून किंवा छापून चालत नाही. साहजिक राहुलचे राफेल कागदी विमान उडवून धंदा होत नसेल आणि मोदींच्या मनसोक्त गप्पा आवडणार असतील तर तोच माल सादर करावा लागेल. पण हे राहुलभक्तांना कसे रूचणार ? त्यांनी अक्षयकुमारांच्या मुलाखतीवर झोड उठवली. कोणीतरी प्रियांका वड्रा यांना मोदीमुलाखतीवर प्रश्न विचारल्यावर मिर्च्या झोंबल्या. त्या म्हणाल्या, ह्यापेक्षा चार शेतक-यांशी संवाद करायला हवा होता. आव असा कि, राहुल सकाळी उठल्यापासून बांधावर शेतकरी-कष्टक-यांशी संवाद साधत असावेत. दोन शेतकरी आपल्याला महाराष्ट्रात मिळतील. त्यापैकी एक रेडिओवर शेती करणा-या मलिष्का आणि बायो"पिक" नावाच्या शेतीमालाचे उत्पादन करणारे सुबोध भावे. यांना शेतकरी म्हणतात असे अलौकिक ज्ञान मला प्रियांकाजींकडून मिळाले. कारण पंतप्रधान वा त्या शर्यतीत असल्याने शेतक-यांशी संवाद करायचा असेल, तर राहुलनीं संवाद साधलेले शेतकरीच असणार ना ? मुळ विषयावर येऊया...गुणहीन लोक गुणवान लोकांना नेहमीच पाण्यात बघतात ! त्यातील दर्जेदार नमुना म्हणजे पत्रकारितेचा आव आणणारे रविश कुमार ! त्यांनी मोदींच्या मुलाखतीवर प्रश्न निर्माण केला कि, त्यांनी अराजकीय मुलाखत दिलीच कशी ?, नामवंत पत्रकाराला बाजूला सारून एका अभिनेत्याला मुलाखत दिली म्हटल्यावर तळपायाची आग मस्तकात जाणे स्वाभाविकच आहे ! रविश कुमारांची सगळ्यात मोठी हरकत हीच होती कि, अक्षयकुमारांनी मोदींना आंब्याबद्दल प्रश्न कसा विचारला ? रविशजींना एक आठवण करून द्यायची आहे ! काही दिवसांपुर्वी बेगुसराय येथे कन्हैय्या कुमारच्या प्रचाराचे प्रसारण आपण करत होता. १०० टक्के राजकीय मुलाखत होती ! एक महत्वाचा प्रश्न विचारला कि, तुम्ही लग्न कधी करणार ? आता एक प्रश्न मला विचारायचा आहे रविशजी ! कन्हैय्या स्वताचा प्रचार करत होता कि स्वतासाठी मुलगी शोधत होता ? का तुम्ही त्याच्यासाठी स्थळ बघायचे मनावर घेतले आहे ? म्हणूनच हा प्रश्न विचारला वाटतं ! रविश कुमारांच्या प्राईम टाईम शोमधून माझे काही ज्ञानार्जन झाले नाही, मात्र मी आंब्याची लस्सी बनवायची कला नक्कीच शिकून घेईन ! ह्या कार्यक्रमात त्यांनी भारतीय आणि चिनी पाककृती ह्यांची सरमिसळ केली आहे. ह्यासाठी त्यांना १०० पैकी १०१ गुण मिळायला पाहिजेत. मोदींची मुलाखत घेण्याची संधी त्यांना मिळाली नाही, म्हणूनच ही खुन्नस असावी. अक्षयकुमार ह्यांनी फक्त पंतप्रधानांचीच मुलाखत का घेतली ? अन्य विपक्षी नेत्यांची मुलाखत का नाही घेतली ? हे पण त्यांचे दु:खणे होते. मोदींनी स्वताचे कपडे धुणे किंवा त्याची ईस्त्री करणे ह्याची त्यांनी खुप टिंगल केली. २१ मिनीटांचा तो मानसिक अत्याचार, पण २१ सेकंदाच्यावर तो कार्यक्रम माझ्या डोक्यात जाऊ लागला. मी कसा काय सहन केला ते माझे मलाच माहित ! जेंव्हा राजदीप सरदेसाई आणि शेखर गुप्ता ह्यांनी सोनिया गांधींची राजनैतिक मुलाखत घेतली. आणि त्यांना सासु-सुनेच्या नात्यावर प्रश्न विचारले तेंव्हा त्यांनी प्राईम टाईम घ्यायला सवड मिळाली नाही. शेवटी म्हणतात, "राजकारणाच्या वातावरणात कोणीही राजकारणावर बोलत नाही, म्हणूनच राजकारणापासून बाजूला सरकूया. वेगळं काहीतरी करूया". ही पहिली वेळ नाही, ह्यापुर्वी रविश कुमारांनी भरपुर नौटंकी केलेल्या आहेत. त्यातील काही प्रमुख उदाहरणे खालीलप्रमाणे - 

१. ४ जानेवारी २०१६ रोजी पठाणकोटवर हल्ला झाला, सैनिक आणि अतिरेक्यांच्यात चकमक चालू होती. तेंव्हा NDTV हे सांगण्यात व्यस्त होती कि, अतिरेक्यांच्या बाजूला विमानतळ आणि सेनातळ आहे ! त्याच्यापुढे तांत्रिक क्षेत्रात युद्धाचे कोणकोणते साहित्य आहे हेदेखील सांगितले. उदा - बिग २१, हेलिकॉप्टर. कहर तर तेंव्हा झाला जेंव्हा फ्युल टँकची स्थिती व त्याचा उपयोगही सांगण्यात येऊ लागला. रविश कुमारांना प्रश्न विचाराण्यासाठी नव्हे तर उत्तर देण्यासाठी रोखले होते. ४ नोव्हेंबर २०१६ रोजी व्यंगरसाने ओतप्रोत असलेल्या ४० मिनीटांच्या नौटंकीनंतर हे सांगण्याचा प्रयत्न केला कि, मोदी सरकार पत्रकारांचे आवाज कसे दाबत आहेत. ह्या कार्यक्रमात पठाणकोट हल्लाबद्दल एक अक्षरही बोलण्यात आले नाही. 

२. "द वायर"च्या कार्यक्रमात बसून रविश कुमार म्हणाले कि, "दोन महिन्यासाठी टी.व्ही. बघणे बंद करा. ह्यामुळे आपल्या देशाचे नुकसान होत आहे आणि लोकशाहीला बरबाद करण्याचे पुरेपर काम टी.व्ही. करत आहे". द वायर ह्या वेबसाईटवर सर्रासपणे खोटं बोलण्यात येते. पुढे रविश कुमार आपल्या चॅनेलच्या जाहिरातीमध्ये सांगतात कि, आमचे चॅनेल DD FREE वर 45 नंबरवर बघा. त्यावर पत्रकार रोहित सरदाना म्हणाले, "हा दुटप्पीपणा आहे ! एक तर त्यांचे ऐका किंवा त्यांच्या चॅनेलचे ऐका. हल्ला झाल्यावर विचारतात, भारत सरकार बदला का घेत नाही ? आणि कारवाई केल्यावर म्हणतात, निवडणुक आहे म्हणून देशाला युद्धात ढकलत आहे". 

३. एकदा बातमी सांगताना रविश कुमार म्हणाले कि, मध्यवर्गीयांना करमाफी देण्यात आली आहे. हे मध्यमवर्गीय कोण आहेत ? ज्यांचा वार्षिक आयकर ५ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे. ७४ टक्के लोक ह्या वर्गात येतात. स्वातंत्र्योत्तर काळापासून करदात्यांची संख्या ३.७९ टक्के होती, ती ६.८५ टक्के झाली होती. पुढे आपल्या अहवालात म्हणतात, करदात्यांची संख्या वाढल्याचा दावा सरकार करत आहे ते चुकीचे आहे. (७ नोव्हेंबर २०१७). दरवर्षी करदात्यांची संख्या वाढत राहते. मग रविश कुमार पहिल्यांदा खोटं बोलत होते कि नंतर खोटं बोलले ? 

४. "गंगेमातेचा आशिर्वाद घेऊन मोदी सत्तेवर आले, मात्र ५ वर्ष उलटली तरी गंगा स्वच्छ झाली नाही" असे त्यांनी आपल्या हेडलाईनमध्ये सांगितले ! १९८४ साली काँग्रेसची सत्ता होती, त्यांनी गंगा स्वच्छतेची मोहिम हाती घेतली. मात्र २०१४ पर्यंत काहीच झाले नाही. २० हजार कोटी व्यर्थ गेले. सीसीमाओ हा कानपुरमधील १२८ वर्ष जुना नाला आहे, ज्यातून १४ कोटी लीटर प्रदुषित पाणी गंगेत मिसळले जायचे. हा नाला मोदी सरकारने बंद केला आहे. 

५. "जे लोक नेतेमंडळींसोबत सेल्फी काढतात, ते मला अजिबात पसंत नाहीत". मात्र ते स्वता अखिलेश यादव ह्यांच्यासोबत सेल्फी काढतात. अखिलेश यादव नेता नाहीत का ? 

६.  नोटबंदीनंतर व्यापारांची मुलाखत घेण्यासाठी रविश कुमार चांदणी चौकात गेले, व्यापा-यांशी चर्चा करू लागले ! व्यापारांची गर्दी वाढली आणि मोदी सरकारच्या ह्या निर्णयाचे कौतुक करू लागले. तिथून ते दुस-या सुरक्षित स्थळी गेले जिथे ७ ते ८ लोक होते. त्यांनी मोदींवर टिका करायला सुरूवात केली, त्यातील एक व्यापारी होते अजय अरोडा ! जे काँग्रेसचे सदस्य निघाले, ज्यांना रविश कुमारांनी व्यापारी म्हणून उभे केले होते ! 

७. "इस चीख को पहचानियें, इस चिल्लाहट को समझियें. इसलिए मैं आपको अंधेरे में लाया हु". असे विधान त्यांनी टी.व्ही.वरून केले. सुर असा होता कि, परत कधीच लोक रविश कुमारांना बघू शकणार नाहीत. पुढे आपल्या इंस्टाग्रामवर म्हणतात, रविश का टाईम कभी खत्म नही होगा ! एक काहीतर ठरवायचे ना, किती वाक्ये बदलायची ? 

८. बिहार काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष ब्रजेश पांडे हे रविश कुमारांचे सख्खे भाऊ ! त्यांच्यावर छेडछाड आणि यौन शोषण असे आरोप असून त्यांना काँग्रेसमधून बडतर्फ करण्यात आले आहे. प्राईम टाईम तर सोडाच, साधी बातमीसुद्धा दाखवली नाही.

तुम्ही मोदी सरकारच्या विरोधात नाही हे आम्ही जाणतो आणि प्रश्न विचारणे चुकीचे नाही. पण लोकांना जे समजायचे आहे ते लोक समजतात ! आता तुमचे चॅनेल चालत नाही तर त्यात लोकांचा दोष काय ? एकतर चांगली पत्रकारिता करा आणि नौटंकी बंद करा किंवा पत्रकारिता सोडून आंब्याची लस्सी बनवायचे दुकान काढा. 

- मिहीर कुलकर्णी. 

चित्रदालन -











Comments

Popular posts from this blog

दोन वाचाळवीर -

दोन तोंडे नको त्यावेळी उचकटली गेली आहेत. एक आहेत मुस्लिमांचे पार्ट टाईम कैवारी मौलाना जावेद अख्तर, आणि दुसरे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे रामभक्त सीताराम येचुरी. हे दोघेही डाव्या विचारांचे असल्यामुळे तोंड उचकटणे हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. भाषणस्वातंत्र्याबरोबर अभिव्यक्तीस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, व्यक्तीस्वातंत्र्य हे त्यांचे अधिकार आहेत. विशेष म्हणजे ह्या अधिकारांची डाव्यांनी कधीच कदर केली नाही, नेहमीच त्यांची मुस्कटदाबी आणि अवहेलना केली. आता हे आयते मिळाल्याने फुकटची मिरासदारी मिरवत आहेत ! श्रीलंकेतील बाँबस्फोटानंतर मुस्लिम महिलांच्या बुरख्यावर बंदी घालण्यात आली, केरळमध्येसुद्धा बंदी घालण्यात आली. (केरळमध्ये माकपचे सरकार आहे) ३ मे २०१९ रोजी बुरख्याप्रमाणे घुंघटावर बंदी घालावी अशी हास्यास्पद मागणी मौलाना अख्तरांनी केली. सामनात मुस्लिम महिलांच्या बुरख्यावर मागणी घालावी, असा लेख आल्याने खळबळ माजली. त्यापुर्वी श्रीलंकेत अध्यादेश काढून सार्वजनिक ठिकाणी बुरखाबंदी केली, फ्रान्समध्येसुद्धा बुरखाबंदी आहे ! मुस्लिम महिलांनी बुरखा घालणे किंवा न घालणे हा त्यांचा प्रश्न आहे. अख्तर ह...

गुरूजींचे विचारधन : सत्य आणि विपर्यास - भाग ३

आक्षेप क्र. ३ - तिरंगा व राज्यघटनेला विरोध. प्रवाहपतितांची घसरगुंडी - उदाहरणार्थ आपल्या नेत्यांनी आपल्या देशासाठी एक ध्वज तयार केला. त्यांची प्रवाहपतित अवस्था, परानुकर...

परत गांधी आमचे सावरकर तुमचे -

नुकतीच एक बातमी वाचनात आली. ती म्हणजे, राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारने १० वी च्या शैक्षणिक अभ्यासक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी एक बदल केला आहे. राजस्थानमध्ये ज्या विचाराचं सरकार येतं, तसे बदल पाठ्यपुस्तकातील इतिहासात होतात. भाजपच्या काळात विस्तारात आणलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या इतिहासाला गेहलोत सरकारने कात्री लावली आहे. जेलमध्ये होणा-या त्रासाला कंटाळून वीर सावरकरांनी ब्रिटीशांकडे चारवेळा दयेची याचिका केली आणि सरकारच्या अनुसार काम करण्याची आणि स्वताला पोर्तुगालचा मुलगा असल्याचं सांगितल्याचा उल्लेख केला. ब्रिटीशांनी सावरकरांची याचिका स्वीकारून १९२१ साली त्यांना जेलमधून मुक्त केले. तिथून सुटल्यावर हिंदूमहासभेत प्रवेश करून देशाला हिंदूराष्ट्र बनविणयाची संकल्पना मांडली. दुस-या महायुद्धाच्या काळात ब्रिटीश सरकारला मदत केली. १९४२ च्या "भारत छोडो" या आंदोलनाला सावरकरांनी विरोध केला होता. तसेच महात्मा गांधींच्या हत्येमधील मुख्य आरोपी नथुराम गोडसेला मदत केल्याच्या आरोपाचाही खटला सुरू होता. त्यातून सावरकरांची मुक्तता झाली, अशा आशयाचा इतिहास शिकवला जाणार आहे. सावरकरांच्...