Skip to main content

गुरूजी कोण होते ?

गेल्या काही महिन्यांपासून मी प.पु.गोळवलकर गुरूजी लिखित "विचारधन"वर कार्य करत होतो. आज माझे कार्य पुर्ण झाले. गुरूजींनी आपले अतिप्राचीन सांस्कृतिक राष्ट्रस्वरूप विरोधाची तमा न बाळगता निर्भीडपणे आणि छातीठोकपणे सांगितले. त्यांच्या विचारांचे नानाप्रकारे विकृतीकरण करून राजकीय भांडवल पैदा करण्याचा प्रयत्न केला. पण टीकेमुळे गुरूजी कधीही क्षुब्ध झाले नाही किंवा आपली पातळी सोडली नाही. हिंदू जीवनविचार आणि त्या विचारांचे मुर्त प्रतीक असलेल्या हिंदूराष्ट्राच्या पुनरूत्थानाचे उद्दिष्ट ह्यापासून ते कधीही ढळले नाही. गुरूजी एक ऋषितुल्य व्यक्तीमत्व होते, आधुनिक काळातील संत म्हटले तरी वावगे ठरणार नाही. समग्र श्रीगुरूजी खंड १२ (श्रद्धासुमन : ह्यात गुरूजींना श्रद्धांजली देणा-यांची वाक्ये आहेत) हे पुस्तक वाचले तरी गुरूजी किती उदात्त व थोर व्यक्तीमत्व होते, याचा अंदाज येतो.
गुरूजींचा जीवनपरिचय खालीलप्रमाणे :
हजारों युवकांच्या मनात वास करणारे व्यक्तीमत्व.

स्वताच्या हाताने ३५ हजार पत्रे लिहीली, एकही खाडाखोड नाही.

आबालांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाला नावाने ओळखणारे.

ओजस व्यक्तीमत्व, अमोघ वाणी, कसदार नेतृत्व.
३३ वर्षांच्या काळात कामाचे डोंगर उभे केले.

कोणत्याही आपत्तीच्यावेळी स्वता संस्था उभारून काम करवून घेतले.

अ.भा.वि.प., विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण आश्रम, भारतीय मजदूर संघ, विवेकानंद शिला स्मारक,
शिशुमंदिरे ह्या सर्वांमागे प्रेरणा गुरूजींची होती.

राजकारणात श्यामाप्रसाद मुखर्जींना पं.दीनदयाळ उपाध्यायांसारखे अनमोल रत्न दिले.

"मला वेळ नाही, मला जमणार नाही" असे वक्तव्य कधीच केले नाही.

श्रीकृष्ण आश्रमातील स्वामी श्री. भास्करेश्वरानंद यांना ज्ञानेश्वरीचे इंग्रजीत भाषांतर करून दिले.
त्यांचा अंधमित्र सावळाराम उत्तम बासरीवादक होता, त्यामुळे गुरूजींनाही बासरीवादनाचा छंद जडला.

ते आपल्या मित्रासाठी मोठमोठे ग्रंथ वाचायचे, आणि मित्राला वाचून दाखवायचे.

जीवनात स्वार्थाचा सुर नसावा म्हणून यतीत जीवन जगले.


नागपुरमध्ये काही काळ  वकिली केली, घरावर "वकिल" अशी पाटी झळकली.

काशीमधील बनारस हिंदू विद्यापीठात त्यांना शिक्षक म्हणून नोकरी लागली, विषय कितीही सोपा असला तरी
मनाशी नीट मांडणी-जूळणी करून, त्याची टिपणे काढून शिकवत. विविध विषयांची माहिती असल्याने त्यांचे शिकवणे जेवढे उद्बोधक तेवढेच मनोरंजक वाटे, अनेक विद्यार्थ्यांना ते आपल्या मोठा भावाप्रमाणे वाटत होते.

याच काळात त्यांनी संस्कृत महाकाव्ये, उपनिषदे,
विवेकानंदांची व्याख्याने आणि पाश्चिमात्य तत्वज्ञान यांचा विशेष अभ्यास केला होता. लवकरच त्यांनी विद्वान शिक्षक असा लौकिक मिळवला. पण त्यापेक्षाही आपल्या परोपकारी वृत्तीमुळे अनेकांची अंत:करणे जिंकून घेतली.

अनेक  विद्यार्थ्यांना फी व पुस्तकासाठी पैसे देत होते, अनेकांना डॉक्टरांकडे स्वताच्या खर्चाने नेत व औषधपाणी करीत.

वर्षातून २ वेळा भारतभ्रमण आणि संघकार्यासाठी अखंड व अविरत प्रवास.

देशभरातील शाखांवर प्रवास आणि त्यादरम्यान शाखा संचलनातील बारकाव्यांवर लक्ष, प्रत्येक कार्यकर्त्याशी आत्मीयतेचे संबंध व घरोघरी सजीव संपर्क उदा - कोल्हापुर प्रवासामध्ये चिमण अष्टेकर.

समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात हिंदुत्वाच्या चिंतनावर अनेक संघटना निर्माण करण्यात महत्वाची भूमिका.
अनेक प्रसंगात देशहितासाठी वेळोवेळी स्पष्ट व परखड भूमिका.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गतिविधींचा अभ्यास करून भविष्यात होणा-या परिस्थितीमधील परिवर्तन व घडामोडी यांचा अचूूक अंदाज. उदा - चीन व पाकिस्तानचे आक्रमण.

१९६६ साली प्रयाग येथे विश्व हिंदू परिषदेच्या संमेलनात सर्व संतांच्या एकमताने "न हिंदू पतितो भवेत" ही घोषणा केली.
गुरूजी विविध गुणांनी संपन्न, अलौकिक व्यक्तीमत्व लाभलेले द्रष्टे महापुरूष होते. आपले संपुर्ण जीवन संघकार्यात विलीन केले. संघाहुन वेगळा आपल्या जीवनाचा भाग प्रकट होऊ नये म्हणून प्रयत्न केला.

कर्करोगाने शरीर पोखरले तेंव्हा ते म्हणाले, "देह विनाशी आहे, पण राष्ट्रकार्य अमर आहे".
५ जून १९७३ साली गुरूजींनी जगाचा निरोप घेतला.

Comments

Popular posts from this blog

दोन वाचाळवीर -

दोन तोंडे नको त्यावेळी उचकटली गेली आहेत. एक आहेत मुस्लिमांचे पार्ट टाईम कैवारी मौलाना जावेद अख्तर, आणि दुसरे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे रामभक्त सीताराम येचुरी. हे दोघेही डाव्या विचारांचे असल्यामुळे तोंड उचकटणे हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. भाषणस्वातंत्र्याबरोबर अभिव्यक्तीस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, व्यक्तीस्वातंत्र्य हे त्यांचे अधिकार आहेत. विशेष म्हणजे ह्या अधिकारांची डाव्यांनी कधीच कदर केली नाही, नेहमीच त्यांची मुस्कटदाबी आणि अवहेलना केली. आता हे आयते मिळाल्याने फुकटची मिरासदारी मिरवत आहेत ! श्रीलंकेतील बाँबस्फोटानंतर मुस्लिम महिलांच्या बुरख्यावर बंदी घालण्यात आली, केरळमध्येसुद्धा बंदी घालण्यात आली. (केरळमध्ये माकपचे सरकार आहे) ३ मे २०१९ रोजी बुरख्याप्रमाणे घुंघटावर बंदी घालावी अशी हास्यास्पद मागणी मौलाना अख्तरांनी केली. सामनात मुस्लिम महिलांच्या बुरख्यावर मागणी घालावी, असा लेख आल्याने खळबळ माजली. त्यापुर्वी श्रीलंकेत अध्यादेश काढून सार्वजनिक ठिकाणी बुरखाबंदी केली, फ्रान्समध्येसुद्धा बुरखाबंदी आहे ! मुस्लिम महिलांनी बुरखा घालणे किंवा न घालणे हा त्यांचा प्रश्न आहे. अख्तर ह...

गुरूजींचे विचारधन : सत्य आणि विपर्यास - भाग ३

आक्षेप क्र. ३ - तिरंगा व राज्यघटनेला विरोध. प्रवाहपतितांची घसरगुंडी - उदाहरणार्थ आपल्या नेत्यांनी आपल्या देशासाठी एक ध्वज तयार केला. त्यांची प्रवाहपतित अवस्था, परानुकर...

परत गांधी आमचे सावरकर तुमचे -

नुकतीच एक बातमी वाचनात आली. ती म्हणजे, राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारने १० वी च्या शैक्षणिक अभ्यासक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी एक बदल केला आहे. राजस्थानमध्ये ज्या विचाराचं सरकार येतं, तसे बदल पाठ्यपुस्तकातील इतिहासात होतात. भाजपच्या काळात विस्तारात आणलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या इतिहासाला गेहलोत सरकारने कात्री लावली आहे. जेलमध्ये होणा-या त्रासाला कंटाळून वीर सावरकरांनी ब्रिटीशांकडे चारवेळा दयेची याचिका केली आणि सरकारच्या अनुसार काम करण्याची आणि स्वताला पोर्तुगालचा मुलगा असल्याचं सांगितल्याचा उल्लेख केला. ब्रिटीशांनी सावरकरांची याचिका स्वीकारून १९२१ साली त्यांना जेलमधून मुक्त केले. तिथून सुटल्यावर हिंदूमहासभेत प्रवेश करून देशाला हिंदूराष्ट्र बनविणयाची संकल्पना मांडली. दुस-या महायुद्धाच्या काळात ब्रिटीश सरकारला मदत केली. १९४२ च्या "भारत छोडो" या आंदोलनाला सावरकरांनी विरोध केला होता. तसेच महात्मा गांधींच्या हत्येमधील मुख्य आरोपी नथुराम गोडसेला मदत केल्याच्या आरोपाचाही खटला सुरू होता. त्यातून सावरकरांची मुक्तता झाली, अशा आशयाचा इतिहास शिकवला जाणार आहे. सावरकरांच्...