Skip to main content

Posts

Showing posts from April, 2019

मोदींची मुलाखत आणि रविश कुमारांचा जळफळाट -

२३ एप्रिल २०१९ रोजी पंतप्रधानांच्या नवी दिल्लीतील ७ लोककल्याण मार्ग येथील निवासस्थानी अभिनेते अक्षयकुमार यांनी नरेंद्र मोदींची चालती-बोलती मुलाखत घेतली. आणि बुधवारी ती प्रसारित करण्यात आली. नेहमी राजकीय प्रश्नाभोवती घुटमळणा-या साच्याला अक्षयकुमारांनी दूर सारले. "मला सैनिक किंवा संन्यासी व्हायचे होते" असे मोदींनी त्यांच्या बालपणीचे लक्ष्य मोदींनी स्पष्ट केले. आंब्याविषयीचे प्रेम सांगतानाच त्यांनी हलाखीच्या कौटुंबिक परिस्थितीच्या आठवणीही सांगितल्या. देशातील राजकीय क्षितिज व्यापलेल्या आणि २४ तास राजकीय भूमिकेतच वावरणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अराजकीय दर्शन बुधवारी देशवासियांना घडले. बालपणीचा अल्लडपणा, कौटुंबिक स्थिती, जीवनाचे लक्ष्य, योगासनांचा प्रभाव ते झोपेचा त्रास आणि अगदी निवृत्ती जीवनापर्यंतच्या गोड-कटू आठवणी, अनुभव, निर्धार खुद्द मोदी यांच्याच शब्दात उलघडले. ही मुलाखत म्हणजे एकप्रकार स्वकथन केलेला बायोपिकच ठरला. अनेक पत्रकार, राजकारणी ह्यांना ही मुलाखत चांगलीच झोंबली. कोणत्याही राजकारणी, पत्रकारांवर मोदींनी कोणत्याप्रकारे टिकाटिप्पणी केली नव्हती. राहुल गांधी -...

श्री तशी सौ -

मागच्या आठवड्यात शबाना आझमींच्या नावाने एक पोस्ट आली होती. आणि त्यात लिहीले होते कि, मैं इस नवरात्री पर अल्लाह से दुआ करती हुँ की लक्ष्मी को भीख ना मांगनी पडे, दुर्गा की भ्रुणहत्या ना हो, पार्वती को दहेज ना देना पडे, सरस्वती बिना स्कूल के अनपढ ना रहे और काली को फेयर एंड लवली की जरूरत ना पडे ! इंशा अल्लाह !" त्यावर त्यांनी संतापून प्रतिक्रिया दिल्या कि, "मी असे कधीच बोलले नाही. हे फारच घृणास्पद आहे कि, आधीच भडकलेले वातावरण ध्रुवीय आणि जातीय बनवले जात आहे. मी सर्व धर्मातील स्त्रियांसाठी काम करते".(०९ एप्रिल २०१९) शबानाजींचा राग अगदी रास्त आहे, कारण कोणी तुमचे नाव आणि फोटो वापरून सोशल मीडियातून अफवा पसरवत असेल आणि समाजात तेढ निर्माण करत असेल तर राग येणे स्वाभाविक आहे. शबाना आझमींसारख्या उदारमतवादी, धर्मनिरपेक्ष, महान समाजसेविका, ज्या उच्च विचारांच्या पातळीवर राहतात त्यांचे नाव वापरून समाजात ध्रुवीय आणि जातीय वातावरण बनवले जात आहे ! हे नक्कीच नीच आणि गलिच्छ लोक असतील, पण कोण आहेत हे लोक ? हे नक्कीच संघाडे, भाजपाई, भक्ताड, सनातनी असेच लोक असतील. शबानाजी अन्य धर्मीयांच्या कु...

६०० जणांचा व्यापक कट तथा महाकारस्थान -

६ एप्रिल २०१७ रोजी बॉलिवूडच्या ६०० कलाकारांनी एक जाहिरनामा उर्फ फतवा काढला. त्यामध्ये असे लिहीले होते कि, "मतदान करा आणि भाजप व त्यांच्या मित्रपक्षांना सत्तेतून हाकलून लावा". ह्याचे नेतृत्व प्रामुख्याने ज्येष्ठ अभिनेते नासिरूद्दीन शाह, अमोल पालेकर, गिरीश कर्नाड, शांता गोखले, मकरंद देशपांडे, महेश एलकुंचवार, महेश दत्तानी, अरूंधती नाग, कीर्ती जैन, अभिषेक मुजूमदार, कोंकणा सेन-शर्मा, रत्ना पाठक-शाह, अनुराग कश्यप, एम.के.रैना, उषा गांगुली आदी कलाकार करत आहेत. १२ भाषांमध्ये हे पत्र तयार करण्यात आले असून आर्टिस्ट युनायटेड इंडिया या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहे. "भारतीय संविधान धोक्यात आहे, भाजपला मतदान करू नका" असे ह्या पत्रात म्हटले आहे. सध्याची निवडणूक देशाच्या इतिहासातील अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. आज भारताची सर्वसमावेशक संकल्पनाच धोक्यात आली आहे. आज आमचे नाणे, गाणे, विनोद हे धोक्यात आले आहे. "आज आमचे प्रिय संविधानदेखील ह्या तडख्यातून सुटलेले नाही". असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. खरतरं हा जाहिरनामा उर्फ फतवा काढला म्हणून आक्षेप घेण्याचे वा ...

गुरूजींचे विचारधन : सत्य आणि विपर्यास (समारोप)

  वरील चित्रांमध्ये आपण पाहु शकता कि, किती खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. संघ कसा चालतो, संघ कार्यकर्ते कसे उभे राहतात, कार्यकर्ता उभी करायची पद्धत कशी असते, संघाची विचाराधारा काय आहे, संघाची शिस्त कशाप्रकारची आहे, संघ आणि सहयोगी संघटना यांचे संबंध निर्धारित करणारे निकष कोणते असतात, ह्या प्रश्नांची माहिती व जूजबी नसताना माहिती व ज्ञानाच्या अभावी अनेक पत्रपंडित संघाविषयी वाट्टेल तसे तारे तोडतात. रा. स्व. संघाचा "भविष्य का भारत - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का दृष्टिकोन" (१७ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०१८) संघकार्याची ओळख करून देणारा हा कार्यक्रम होता. देश-विदेशतील लोकांना निमंत्रण देण्यात आले होते. भारतातील संघविरोधक, संघद्वेष्ट्यांनाही निमंत्रण दिले होते. एकजण फिरकला नाही, कारण त्यांच्याकडे बोलण्यासारखे नवीन मुद्दे नाहीत. तेच-तेच खोडलेले आरोप करत राहतात. ह्या कार्यक्रमात सरसंघचालकांनी प्रत्येक आरोपांचे खंडन केले होते. संघ "विचारधन"पुर्वीसुद्धा चालत होता. संघ ही शब्दप्रामाण्यवादी वा ग्रंथप्रामाण्यवादी संघटना नसून काळा...