"शंभुराजांनी संस्कृतमध्ये ग्रंथ लिहीले आणि शुद्रांनाही संस्कृत शिकवले. म्हणूनच ब्राह्मणांनी मनुस्मृतीप्रमाणे त्यांची हत्या केली आणि त्यांचे कापलेले शिर भाल्याला टांगून सर्वत्र जत्रा काढली. त्यांच्या हत्येपुर्वी कधीही गुढी उभारली जात नव्हती. हा सण ब्राह्मणांच्या विजयाचे प्रतिक आहे त्याचा बहुजनांशी काडीचाही संबंध नाही." वाचून हसू आले ना ?
अश्या पद्धतीचे संदेश संभाजी ब्रिगेडकडून पसरवले जातात. पुढच्या आठवड्यात गुढीपाडवा असल्याने विषारी वातावरण तयार करायची प्रक्रिया सुरू असेल.
गुढीपाडवा इ.स. ७८ मध्ये सुरू झाला.
गौतमीपुत्र श्री सातकर्णीने शक राजा नहपानवर विजय मिळविला आणि त्या विजयाचे प्रतिक म्हणून गुढी उभारण्याचा कार्यक्रम सुरु झाला.
हा स्वातंत्र्यदिवस आहे, गौतमीपुत्राने सर्व महाराष्ट्र जिंकला होता. ज्या गावात शंभुराजांची हत्या झाली, जिथे अंत्यसंस्कार झाला त्या आजूबाजूच्या गावात आजही गुढी उभारली जाते. ज्या वर्षी शंभुराजांच्या हत्या झाली फक्त त्याचवर्षी गुढी उभारली गेली नाही.
औरंगजेब हा कट्टर मुसलमान होता आणि हिंदुत्वाचा कडवा विरोधक होता, त्याला मनुस्मृतीचा आधार घ्यायची काय गरज होती ?
गुढीपाडव्याच्या एकदिवस अगोदर हत्या केली. कारण, गुढी उभारली जाऊ नये आणि समस्त हिंदू समाज आपल्याला शरण यावा. आता गुढी
न उभारून आपण औरंगजेबाला शरण जातोय असा अर्थ होतो, म्हणजे त्याच्या कारस्थानाला आपण साहाय्य करतोय.
शंभुराजांच्या जन्मापुर्वीसुद्धा गुढीपाडवा साजरा व्हायचा. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत
तुकाराम ह्यांची गुढीवरील वचने प्रसिद्ध आहेत.
पुर्वी गुढीवर तांब्या/कलश नव्हते तर गडू (गडवा) नावाचे जाड पितळेचे पात्र ठेवले जायचे. व्यक्तीगत आनंद साजरा करण्यासाठीही गुढी उभारली जायची. कडुलिंबच का ?
तर सगळ्यात जास्त औषधी वनस्पती म्हणून कडुलिंब घराजवळ त्याकाळी वाढविले जायचे.
कडुलिंब हा कधीही खाल्ला जात नसे म्हणून त्या सणाला त्याचे महत्व वाढले. साखरेच्या गाठीचा शोध अलीकडचा आहे.
ह्या दिवशी वसंत ऋतुची सुरूवात होते. ह्या दिवशी हवामान समशीतोष्ण व उत्साहवर्धक असते. पाडव्याच्या दिवशीच झाडांना पालवी फुटते आणि वृक्षावल्ली टवटवीत राहते.
परत इतिहासाकडे वळूया...
शंभुराजांच्या हत्येचा संबंध मनुस्मृतीशी जोडतात. ज्या पद्धतीने शंभुराजांची हत्या झाली त्याच पद्धतीने औरंगजेबाला आपला थोरला भाऊ दारा शुकोहची हत्या केली होती.
दाराची हत्या करायला कोण ब्राह्मण पुढे आला ? त्यावर आणि फाटे फोडताना विचारतात कि, गुढीपाडवा सण बाहेरच्या राज्यातला आहे, मग आपण का साजरा करावा ? मग दहीहंडी, दसरा, रक्षाबंधन, दिवाळी हे सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मग गुढी का चालत नाही ?
आता ब्रिगेडींना काही प्रश्न -
१. शंभुराजांचे अधिक आयुष्य स्वकीयांची कारस्थाने व शत्रुंच्या कुरघोड्यांना तोंड देण्यात गेले. तर ते ब्राह्मणेत्तरांना संस्कृत कधी शिकवणार ? ते काही समाजसुधारक होते ?
२. रामायण लिहीणारे ऋषि वाल्मिकी व महाभारत लिहीणारे महर्षी व्यास ह्यांनीसुध्दा संस्कृत भाषेतून लिखाण केले. मग त्यांची हत्या का झाली नाही ? उलट ब्राह्मण त्यांचे ग्रंथ शिरसावंद्य मानतात, असे का ?
३. हत्येचा आनंद साजरा करण्यासाठी गुढी उभारली जात होती तर त्यावेळी महाराणी ताराबाई, राजाराम महाराज, संताजी-धनाजी हे झोपले होते का ?
४. ब्राह्मणांचे ऐकायला रयत दुधखूळी होती का ?
५. ब्राह्मणांच्या सांगण्यावरून स्वताच्या राजाचा
बलिदान दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा करायला त्यांचे वंशज काय मुघलांची औलाद होते का ?
गुढीपाडवा मोठ्या जल्लोषात साजरा करूया, कारण ते आपल्या विजयाचे प्रतिक आहे.
आता तुम्हीच ठरवा कि, गुढी न उभारून औरंगजेबाला शरण जायचे का गुढी उभारून शंभुराजांना श्रद्धांजली वाहायची !
- मिहीर कुलकर्णी.
छान लेख
ReplyDeleteधन्यवाद !
ReplyDelete