Skip to main content

संघ म्हणजे काय ?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ -
हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. काहीजणांच्या मते,
संघ म्हणजे गोळवलकर गुरूजी, विचारधन, भाजप किंवा अन्य प्रमुख व्यक्ती !

खरंतर संघ म्हणजे मैदानावर दररोज
सकाळ-संध्याकाळ भरणारी शाखा -
जिथे लहान-मोठा, श्रीमंत-गरीब, धर्म, जात, वंश, भाषा, प्रदेश अशा क्षुद्र गोष्टींना महत्व न देता भारतमातेचे सुपूत्र ह्या नात्याने एकत्र येतात.
  एकत्र खेळ, व्यायाम, योगासने, सांघिक गीत,
बोधकथा सांगणे ह्या गोष्टी अनुभवायच्या असतात. वाईट व्यसने, दुर्गुण दूर लोटून भगव्या
ध्वजासमोर चारित्र्याची, विकसित भारताची,
मातृभूमी व समस्त मानवजातीची सेवेची प्रार्थना
करतात.

संघ म्हणजे कार्यवाह व मुख्यशिक्षक -
प्रत्येक भारतीयांमध्ये नेतृत्वगुण व चांगले संस्कार व्हावे म्हणून शाखेवरील स्वयंसेवकांना
आई-वडिलांप्रमाणे जपणारे हे दोन शिलेदार.
ज्यांची नुकतीच मुसरूड फुटलेली असते, पण शाखेवर सर्वांचे आई वडिल होतात. गम्मत म्हणजे आपल्या घरी कधी कधी लहान मुलासारखा हट्ट करतात.

संघ म्हणजे गटनायक -
आपल्या परिसरातील राहणा-या स्वयंसेवकांची मोठ्या भावाप्रमाणे काळजी घेणार आणि वेळप्रसंगी चुकीच्या घटनांवर रागवणारा.
घरातील प्रसंगाची विचारपूस करणारा.
गटातील स्वयंसेवकांवर प्रेम करणारा.
एक असे नेतृत्व ज्याच्या सानिध्यात लोखंडाचे
सोने होते.

संघ म्हणजे स्वयंसेवक -
संघ म्हणजे प्रत्येक स्वयंसेवक. विद्यार्थी असेल
तर अभ्यास व व्यायाम भारतमातेच्या वैभवासाठी करणारा. पालक व कुटूंबाला देव मानून त्यांची मनोभावे सेवा करणारा.
प्रचंड शिस्तप्रिय असा बाल-तरूण.
   व्यावसायिक असेल तर कमी वेळेत आपल्या
मातृभूमीसाठी काही वेळ खर्च करणारा.
आपल्या व्यवसायाशी प्रचंड नम्र व प्रामाणिक असणारा. आपल्या कुटूंबाची यशस्वीरित्या काळजी घेणारा आणि व्यसनांपासून दूर असा चारित्र्यवान व प्रगल्भ जो समर्पित आहे, विकसित भारताच्या ध्येयासाठी साठी व स्वपनपुर्तीसाठी.
   प्रौढ व वृद्ध असेल तर अापल्या अनुभवावरून समाजाला प्रेम वाटणारा. असे लाखो ज्येष्ठ स्वयंसेवक आहेत ज्यांना आपल्या कुटूंब व राष्ट्राची जवाबदारी यशस्वीरित्या पार पाडत
कष्टाने व चारित्र्याने मिळवलेली संपत्ती मातृभूमीला समर्पित केली आहे.
   शिशू, बाल, तरूण, प्रौढ, वृद्ध असा ,शिस्तप्रिय, चारित्र्यावान, समर्पित, राष्ट्रनिष्ठ असा स्वयंसेवक. ज्याचे आयुष्य संघकार्याने पावन झाले आहे तो म्हणजे संघ.

"बंधूंनो ! एक वेळ अशी नक्की येईल कि,
प्रत्येक भारतीय नागरिक होईल व संघ समाजात
विलीन होईल. मग संघाची आवश्यकता भासणार नाही". - मिहीर कुलकर्णी.
  
  

Comments

Popular posts from this blog

दोन वाचाळवीर -

दोन तोंडे नको त्यावेळी उचकटली गेली आहेत. एक आहेत मुस्लिमांचे पार्ट टाईम कैवारी मौलाना जावेद अख्तर, आणि दुसरे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे रामभक्त सीताराम येचुरी. हे दोघेही डाव्या विचारांचे असल्यामुळे तोंड उचकटणे हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. भाषणस्वातंत्र्याबरोबर अभिव्यक्तीस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, व्यक्तीस्वातंत्र्य हे त्यांचे अधिकार आहेत. विशेष म्हणजे ह्या अधिकारांची डाव्यांनी कधीच कदर केली नाही, नेहमीच त्यांची मुस्कटदाबी आणि अवहेलना केली. आता हे आयते मिळाल्याने फुकटची मिरासदारी मिरवत आहेत ! श्रीलंकेतील बाँबस्फोटानंतर मुस्लिम महिलांच्या बुरख्यावर बंदी घालण्यात आली, केरळमध्येसुद्धा बंदी घालण्यात आली. (केरळमध्ये माकपचे सरकार आहे) ३ मे २०१९ रोजी बुरख्याप्रमाणे घुंघटावर बंदी घालावी अशी हास्यास्पद मागणी मौलाना अख्तरांनी केली. सामनात मुस्लिम महिलांच्या बुरख्यावर मागणी घालावी, असा लेख आल्याने खळबळ माजली. त्यापुर्वी श्रीलंकेत अध्यादेश काढून सार्वजनिक ठिकाणी बुरखाबंदी केली, फ्रान्समध्येसुद्धा बुरखाबंदी आहे ! मुस्लिम महिलांनी बुरखा घालणे किंवा न घालणे हा त्यांचा प्रश्न आहे. अख्तर ह...

गुरूजींचे विचारधन : सत्य आणि विपर्यास - भाग ३

आक्षेप क्र. ३ - तिरंगा व राज्यघटनेला विरोध. प्रवाहपतितांची घसरगुंडी - उदाहरणार्थ आपल्या नेत्यांनी आपल्या देशासाठी एक ध्वज तयार केला. त्यांची प्रवाहपतित अवस्था, परानुकर...

परत गांधी आमचे सावरकर तुमचे -

नुकतीच एक बातमी वाचनात आली. ती म्हणजे, राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारने १० वी च्या शैक्षणिक अभ्यासक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी एक बदल केला आहे. राजस्थानमध्ये ज्या विचाराचं सरकार येतं, तसे बदल पाठ्यपुस्तकातील इतिहासात होतात. भाजपच्या काळात विस्तारात आणलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या इतिहासाला गेहलोत सरकारने कात्री लावली आहे. जेलमध्ये होणा-या त्रासाला कंटाळून वीर सावरकरांनी ब्रिटीशांकडे चारवेळा दयेची याचिका केली आणि सरकारच्या अनुसार काम करण्याची आणि स्वताला पोर्तुगालचा मुलगा असल्याचं सांगितल्याचा उल्लेख केला. ब्रिटीशांनी सावरकरांची याचिका स्वीकारून १९२१ साली त्यांना जेलमधून मुक्त केले. तिथून सुटल्यावर हिंदूमहासभेत प्रवेश करून देशाला हिंदूराष्ट्र बनविणयाची संकल्पना मांडली. दुस-या महायुद्धाच्या काळात ब्रिटीश सरकारला मदत केली. १९४२ च्या "भारत छोडो" या आंदोलनाला सावरकरांनी विरोध केला होता. तसेच महात्मा गांधींच्या हत्येमधील मुख्य आरोपी नथुराम गोडसेला मदत केल्याच्या आरोपाचाही खटला सुरू होता. त्यातून सावरकरांची मुक्तता झाली, अशा आशयाचा इतिहास शिकवला जाणार आहे. सावरकरांच्...