आक्षेप क्र. ३ - (भाग २) तिरंगा व राज्यघटनेला विरोध "राष्ट्रगीताची सक्ती आणि वंदेमातरम कि जन-गण-मन वाद" : RSS कार्यकर्त्यांच्या नजरेतून". लेखक - महेश मोहन वैद्य. विशेष सुचना - सदर लेखात व्यक्त केलेले विचार व्यक्तीगत आहेत. Inmarthi.com त्या विचारांशी सहमत असेलच असे नाही. आधुनिक काळात जागतिक पटलावर कोणत्याही देशाची ओळख किंवा अस्मिता राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत ह्या दोन गोष्टींनी अधोरेखित होतात. राष्ट्रध्वज ह्यांना भारतात काय जागतिक इतिहासात काय लाखो-हजारो वर्षांची परंपरा आहे. अगदी छोट्या संस्थानांपासून ते मोठ्या साम्राज्यापर्यंत प्रत्येकाचा वेगळा ध्वज आणि त्याचा अभिमान दोन्ही सोबत चालले आहेत. पण राष्ट्रगीत ही १९ व्या शतकाची भेट आहे. तिचा एवढा प्रसार झाला कि, आज जगात अस्तित्वात असलेल्या प्रत्येक ज्ञात आणि अज्ञात प्रत्येक देशाचे राष्ट्रगीत त्या त्या देशाचे मानचिन्ह आहे. राष्ट्रगीताचा वाद नक्की काय आहे हे माहित नसताना, विविध लोकांच्या अनेक उलटसूलट प्रतिक्रिया बघायला मिळल्या. प्रथम भारताचे राष्ट्रगीत जन-गण-मन लिहील्यापासूनच वादाची किनार मागे लागली आहे. हे "जन-गण-मन...